देशाच्या सुरक्षेसाठी आकाशात झेपावणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या एएन-३२ विमानाला आसाममधील जोरहाट येथे झालेल्या दुर्घटनेत पाच कर्तव्यदक्ष जवानांना आपले प्राण गमवावे लागल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या या वीरांनी कर्तव्य बजावताना दिलेले बलिदान संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे.
स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंह, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायु खेमाराम कुमावत आणि अग्निवीरवायु दानिश आलम यांचे बलिदान राष्ट्र कधीही विसरणार नाही.
या शूरवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.
ॐ शांती!🙏🏻
जय हिंद..!!🇮🇳