पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट येथे कंटेनरचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर आणि सिमेंटचा बल्कर या दोन वाहनांच्या मध्ये पुढे जात असलेली कार चेपली गेल्याने अपघात झाला.
दरम्यान दोन ते तीन वाहने एकमेकांवर आदळली. यात तिघांचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी झाला. अंबादास पेटारे (रा. सिंहगड रोड), श्रीकांत जाधव (वय ६३), प्रमोद पवार अशी कारमधील मृत्युमुखींची नावे आहेत. जखमींमध्ये स्वप्नील भुजबळ (३६), नवनाथ भुजबळ (३२, दोघेही रा. तळेगाव ढमढेरे), अक्षय गायकवाड (३१, रा. शिक्रापूर), भानुदास गायकवाड (२६, रा. चाकण, खेड) आणि कंटेनरचालक अवधेश राधेश्याम यादव (वय ३७, रा. सहराजा, जि. आझमगड, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे.