"विकास, विश्वास आणि परिवर्तन, मोदी युगाची कथा"
नरेंद्रजी मोदींचा प्रवास हा फक्त एका व्यक्तीचा नाही, तर एका युगाचा आहे. सामान्य कुटुंबातील चहा विकणारा मुलगा, संघाचा कार्यकर्ता, गुजरातचा मुख्यमंत्री आणि अखेर जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा प्रधानमंत्री हा प्रवास संघर्ष, विचार आणि कर्म यांचा संगम आहे. “मोदी मिशन” हे केवळ राजकीय अभियान नाही; ते भारताच्या नव्या आत्मविश्वासाचं, नव्या विचारांचं प्रतीक आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदापासून मोदीजींनी प्रशासनाचं नवं परिमाण दिलं. विकास हा राजकारणाचा केंद्रबिंदू असावा, हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिलं. जलसंवर्धन, उद्योगसुलभता, स्वच्छता, ई - गव्हर्नन्स या सर्व गोष्टी गुजरातमध्ये यशस्वी झाल्या आणि पुढे त्या भारतासाठी आदर्श ठरल्या. लोकशाहीच्या व्यवस्थेत नेता बदलतो, पण विचार कायम राहतो मोदीजींचा विचार होता “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास.”
2014 मध्ये भारताच्या राजकारणात नवं पर्व सुरू झालं. देश थकला होता भ्रष्टाचाराने, अस्थिरतेने, दुटप्पी धोरणांनी. अशा वेळी नरेंद्र मोदींचं नेतृत्व जनतेला आशेचा किरण वाटलं. त्यांनी लोकांना फक्त स्वप्न दाखवलं नाही; त्या स्वप्नाला दिशा दिली. जनधन योजनाने लाखो गरीबांचं बँकिंग जगात स्वागत केलं. उज्ज्वला योजनेने घराघरात धुराशिवाय स्वयंपाकाचा अनुभव दिला. स्वच्छ भारत मिशनने स्वच्छतेला राष्ट्रीय संस्कार बनवलं. आणि आयुष्मान भारतने गरीबांना आरोग्य सुरक्षा दिली.
मोदीजींच्या कारकीर्दीचा सर्वात प्रभावी भाग म्हणजे डिजिटल क्रांती.
भारत जिथे रोख व्यवहारात गोंधळात होता, तिथे त्यांनी UPI, Aadhaar, DigiLocker, CoWIN, GeM अशा प्रणाली घडवल्या. करोडो लोकांचा डेटा सुरक्षित ठेवत भारताने डिजिटल सार्वभौमत्व निर्माण केलं. आज गावातील शेतकरीही मोबाईलवर व्यवहार करतो, विद्यार्थी सरकारी शिष्यवृत्ती थेट खात्यात घेतो, आणि नागरिक बँकेच्या रांगेत न थांबता शासनाशी संवाद साधतो हा “नवा भारत” नरेंद्रजी मोदींच्या डिजिटल दृष्टिकोनातून जन्माला आला आहे.
याचबरोबर सामाजिक न्याय हा त्यांच्या कारभाराचा मुख्य स्तंभ ठरला. जाती - धर्म - प्रदेश यापलीकडे जाऊन वंचितांना मुख्य प्रवाहात आणणं हे त्यांचं ध्येय राहिलं. प्रधानमंत्री आवास योजना, मुद्रा योजना, जल जीवन मिशन, वन नेशन, वन रेशन कार्ड यांसारख्या उपक्रमांनी सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढवला. “गरीबाला घर, पाण्याची व्यवस्था, शौचालय, आणि बँक खाते” हे जेव्हा वास्तवात उतरलं, तेव्हा भारतात शासनावर विश्वास वाढला.
कोविड - 19 महामारीच्या काळात जेव्हा जग हादरलं, तेव्हा भारताने स्वदेशी लसी विकसित केल्या. CoWIN प्लॅटफॉर्ममुळे 200 कोटींपेक्षा जास्त लसीकरणे नीट पार पडली. भारताने जगाला दाखवलं की संकट हे केवळ आव्हान नसतं ते संधी बनवता येतं. हीच मोदींजीची कार्यशैली आहे.
आंतरराष्ट्रीय पटलावरही मोदींची छाप विलक्षण आहे. भारताला त्यांनी जागतिक मंचावर “विश्वगुरू” बनवलं. अमेरिका, जपान, फ्रान्स, इस्रायल, रशिया या देशांसोबत संबंध मजबूत करताना त्यांनी “भारत म्हणजे विश्वासार्ह भागीदार” हे सिद्ध केलं. “Make in India”, “Startup India”, “Atmanirbhar Bharat” या मोहिमांनी भारतात उत्पादन, रोजगार आणि नवोन्मेषाचं युग सुरू केलं. आज भारत G20 अध्यक्ष देश, चंद्रयान -3, 5G भारत आणि AI क्रांतीचा नवा नेता म्हणून जगात ओळखला जातो.
त्यांच्या धोरणांतून एक गोष्ट सातत्याने दिसते धैर्याने निर्णय घेणे. नोटबंदी असो, GST असो, जम्मू-कश्मीरचा कलम 370 असो, किंवा महिलांसाठी संसदेत 33% आरक्षणाचा विधेयक मोदीजींनी प्रत्येकवेळी “राजकीय फायदा तोटा” न पाहता, दीर्घकालीन परिणाम पाहिले. आणि म्हणूनच त्यांची ओळख केवळ राजकारणी म्हणून नाही, तर “नीतीनिर्माता” म्हणून झाली.
11 वर्षांच्या कार्यकाळात मोदीजींनी भारताच्या आत्मविश्वासाला पंख दिले. जे भारताला “तीसऱ्या जगातील देश” म्हणत होते, तेच आज “विश्वाची वाढ भारताशिवाय अपूर्ण आहे” असं म्हणतात. ग्रामीण भारत उजळला, उद्योग जगात भारत चमकला, आणि युवाशक्तीने आत्मनिर्भरतेचा झेंडा उंचावला.
मोदींजीचं नेतृत्व म्हणजे केवळ प्रशासन नव्हे, ते दिशादर्शन आहे.
ते सांगतात “नेता तोच, जो लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो.” आज भारतातील तरुण त्यांच्या डोळ्यातील आशा, आत्मविश्वास, आणि कर्तृत्व पाहतो.
“मोदी मिशन” हे फक्त पुस्तक नाही, ते एक जिवंत साक्षीदार आहे. एका युगाच्या परिवर्तनाचं. ही कथा एका नेत्याची नाही, तर 140 कोटी जनतेच्या आत्मविश्वासाची आहे. आणि म्हणूनच नरेंद्रजी मोदींचं नाव केवळ राजकारणात नव्हे, तर भारताच्या इतिहासात एक प्रेरणा म्हणून कोरलं गेलं आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis जी यांच्या हस्ते
#ModiMission या ग्रंथाचे प्रकाशन होत आहे.