Member of Legislative Council - Maharashtra (Thane-Kokan Graduates Constituency) | General Secretary @BJP4Maharashtra | Ex BJP Thane City President

Joined September 2014
11,088 Photos and videos
कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आता आर्थिक संकट ठरणार नाही! आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्यसेवेत एक मोठी क्रांती घडली आहे. आज देशात ४३ कोटींहून अधिक आयुष्मान भारत कार्ड्स जारी करण्यात आले असून, कोट्यवधी कुटुंबांना ₹५ लाखांपर्यंत मोफत आणि कॅशलेस उपचारांची हमी मिळाली आहे. ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य संरक्षण, ABHA ID द्वारे डिजिटल हेल्थ रेकॉर्ड्स आणि देशभरातील १.८ लाखांहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरांमुळे आरोग्यसेवा आता अधिक सुलभ, सुरक्षित आणि सर्वसमावेशक झाली आहे. आयुष्मान कार्ड हे केवळ एक कार्ड नाही, तर १४० कोटी भारतीयांच्या आरोग्य, सुरक्षा आणि सन्मानाची हमी आहे! #12YearsOfSwasthBharat #AyushmanBharat #NirantarDhyas #niranjandavkhare
7
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री. राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा! @RajThackeray #RajThackeray #NirantarDhyas #NiranjanDavkhare
2
12
214
🩸 जागतिक रक्तदाता दिन 🩸 रक्तदान हे श्रेष्ठ दान… कारण तुमच्या एका रक्तदानाने एखाद्याला नवजीवन मिळू शकते. रक्तदानाने केवळ एक आयुष्यच वाचत नाही, तर एखाद्या कुटुंबाच्या आशा, स्वप्ने आणि आनंदालाही नवी ऊर्जा मिळते. चला, मानवतेचा हात पुढे करत नियमित रक्तदानाचा संकल्प करूया. #WorldBloodDonorDay #BloodDonation #DonateBloodSaveLives #NirantarDhyas #niranjandavkhare
1
67
संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचा नवा अध्याय! आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारत संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनाची भक्कम झेप घेत आहे. वडोदरा येथील उत्पादन केंद्रात तयार झालेले पहिले ‘Made in India’ C-295 टॅक्टिकल ट्रान्सपोर्ट विमान सप्टेंबरमध्ये रोल आउट होणार आहे, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. हे विमान संरक्षण उपकरण बरोबरच भारताच्या तंत्रज्ञान, कौशल्य आणि स्वदेशी क्षमतेवर असलेल्या अढळ विश्वासाचे प्रतीक आहे. आत्मनिर्भर भारत… सुरक्षित भारत… सक्षम भारत! #MadeInIndia #C295 #AtmanirbharBharat #DefenceIndia #NirantarDhyas #NiranjaDavkhare
16
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत भारताने आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करत विकासाची नवी दिशा प्राप्त केली आहे. पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, सामाजिक कल्याण आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून देशाने जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र दादा चव्हाण यांनी ठाणे येथील पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण उपलब्धींचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित राहून या परिवर्तनाच्या प्रवासाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. या पत्रकार परिषदेची नवभारत या हिंदी वृत्तपत्राने घेतली दखल! #12YearsOfModiGovernment #MediaCoverage #NirantarDhyas #niranjandavkhare
11
*'दिल्लीतून निघालेला १ रुपया, आता थेट गरिबांच्या खात्यात!'* एकेकाळी दिल्लीतून पाठवलेल्या १ रुपयातील फक्त १५ पैसेच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात, अशी खंत व्यक्त केली जात होती... पण आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी जनधन - आधार - मोबाईल (JAM) या त्रिसूत्रीच्या माध्यमातून ही व्यवस्था पूर्णपणे बदलून टाकली. आज DBT (Direct Benefit Transfer) मुळे सरकारी योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. दलालांची साखळी तुटली, भ्रष्टाचाराला आळा बसला आणि सुशासनाचा नवा आदर्श निर्माण झाला! पारदर्शकता, तंत्रज्ञान आणि गरीब कल्याण यांचा संगम म्हणजे मोदी सरकारचे सुशासन मॉडेल! #12YearsOfSeva #DBT #JAMTrinity #NirantarDhyas #NiranjanDavkhare
7
प्रबुद्ध नागरीक संमेलना निमित्ताने आज सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यातील आदर्श इन्स्टिट्यूट टेक्निकल अँड रिसर्च सेंटर या संस्थेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र दादा चव्हाण यांच्यासह भेट दिली. या प्रसंगी इन्स्टिट्यूट मधील विचारवंत,तज्ञ, आदी प्रतिष्ठित नागरीकांशी संवाद साधला आणि आपले विचार मांडले. याप्रसंगी दादांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच मोदी सरकारच्या १२ वर्षांतील कामगिरीचा आढावा मांडणाऱ्या 'विकसित भारताचा संकल्प' या माहितीपत्रकाचे देखील अनावरण करण्यात आले. या पत्रकाच्या माध्यमातून गेल्या १२ वर्षांतील भारताच्या प्रगतिपथावरील वाटचालीचा संक्षिप्त आढावा घेण्यात आला आहे. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. श्री. जयकुमार गोरे, भाजपचे सांगली ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 📍 विटा, जि. सांगली 🗓️ १३ जून २०२६ #12YearsOfModiGovernment #Mahayuti #Vita #NirantarDhyas #niranjandavkhare
1
1
44
सातारा जिल्ह्यातील सैदापूर, ता. कराड येथे सदिच्छा भेटीच्या निमित्ताने भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. सैदापूरचे सरपंच श्री. फत्तेसिंह धनाजीराव जाधव (भैय्या) यांच्या निवासस्थानी आयोजित कोपरा सभेत आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या १२ वर्षांच्या यशस्वी नेतृत्वाची आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाची माहिती उपस्थितांपर्यंत पोहोचवण्यात आली. भारताच्या लोकशाही इतिहासात सर्वाधिक काळ लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून कार्य करण्याचा मान, सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची जबाबदारी, एकाही निवडणुकीत पराभव न स्वीकारलेली राजकीय कारकीर्द, जगभरातील ३२ आंतरराष्ट्रीय सन्मान आणि विविध देशांच्या संसदांना १९ वेळा केलेले संबोधन या माध्यमातून आदरणीय श्री.नरेंद्र मोदीजी यांनी भारताची जागतिक ओळख अधिक भक्कम केली आहे. आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशातील २५ कोटींपेक्षा अधिक नागरिक दारिद्र्यरेषेबाहेर आले असून भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. गरीब कल्याण, पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारताच्या संकल्पनेमुळे देश नव्या उंचीवर पोहोचत आहे. या सर्व जनकल्याणकारी योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवून जनजागृती करण्यासाठी ही कोपरा सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी सातारा जिल्हा परिषद सदस्य श्री. सागर शिवदास, श्री. नानासो पाटसुपे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. राजकीरण जाधव, माजी खरेदी-विक्री संघ संचालक श्री. प्रकाश पवार, बेलवडे बुद्रुकचे सरपंच डॉ. सुशांत मोहिते तसेच सौ. मंजिरी कुलकर्णी, सौ. सविता देसाई, श्री. सौरभ टोंनपे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 📍 सैदापूर, ता. कराड, जि. सातारा 🗓️ १३ जून २०२६ #NarendraModi #12YearsOfModiGovernment #CornerMeeting #NirantarDhyas #NiranjaDavkhare
1
1
58
विकसित भारतासाठी घडणारी ‘अमृत पिढी’! शिक्षणापासून स्टार्टअप्सपर्यंत, क्रीडापासून नवोन्मेषापर्यंत भारताची युवा शक्ती प्रत्येक क्षेत्रात नवा इतिहास घडवत आहे. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीमुळे आणि युवा सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांमुळे आजची पिढी आत्मविश्वासाने ‘विकसित भारत’ घडवण्याच्या प्रवासाचे नेतृत्व करत आहे. A Generation Built for Viksit Bharat! #12YearsOfYuvaShakti #ViksitBharat #NirantarDhyas #NiranjanDavkhare
8
सांगली–सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र दादा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील समन्वय, बूथनिहाय नियोजन तसेच विजयासाठी आवश्यक धोरणात्मक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रदेशाध्यक्षांनी प्रत्येक कार्यकर्त्याने निवडणुकीकडे केवळ राजकीय स्पर्धा म्हणून नव्हे, तर विकास, सुशासन आणि जनविश्वासाचा विजय म्हणून पाहावे, असे आवाहन केले. महायुतीचे उमेदवार श्री. धैर्यशील कदम यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला. पक्ष संघटनाची ताकद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा विश्वास यांच्या बळावर महायुतीचा विजय निश्चित करण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. श्री. जयकुमार गोरे, खासदार मा. छत्रपती उदयनराजे भोसले, भाजपा महायुतीचे उमेदवार श्री. धैर्यशील कदम तसेच आमदार श्री. अतुलबाबा भोसले, श्री. मनोज घोरपडे, श्री. महेश शिंदे, श्री. गोपीचंद पडळकर, श्री. सदाभाऊ खोत, श्री. सत्यजीत देशमुख यांच्यासह पक्षातील सर्व लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 📍 सातारा 🗓️ १३ जून २०२६ #Mahayuti #SangliSatara #VidhanParishadElection2026 #NirantarDhyas #NiranjaDavkhare
2
46
केंद्रीय वाणिज्य व उद्योग्य मंत्री श्री. पीयूष गोयल यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा! #PiyushGoyal #NirantarDhyas #NiranjanDavkhare
1
1
28
नेतृत्वातला विनोदबुद्धीचा स्पर्श... आणि हजरजबाबीपणाची कमाल! स्वतःच्या क्षेत्रावरही विनोद करण्याचं धाडस आणि प्रत्येक प्रसंगात वातावरण हलकं-फुलकं ठेवण्याची कला हेच मोठ्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य असतं. आणि ते आपल्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहेत. निर्णय घेणारा नेता, विकासाला वेग देणारा प्रशासक आणि वेळप्रसंगी हजरजबाबीपणे सगळ्यांना हसवणारा माणूस. हि अनेक वैशिष्ट्ये माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या आहेत. आणि म्हणून ते केवळ मुख्यमंत्री नाहीत, तर जनतेच्या मनातील एक आपला माणूस आहेत! #DevendraFadnavis #Leadership #Humour #NirantarDhyas #NiranjanDavkhare
44
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे १२०० हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष श्री. जयेंद्र कोळी आणि नगरसेविका सौ. नम्रता कोळी यांच्या पुढाकारातून गेली अनेक वर्षे राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक पाठबळ मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देत शिक्षणाचा दीप अधिक तेजाने प्रज्वलित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या माध्यमातून होत आहे. या प्रेरणादायी उपक्रमाची वृत्तपत्रांनी घेतलेली दखल! #EducationForAll #MeritoriousStudents #MediaCoverage #NirantarDhyas #NiranjanDavkhare
1
18
दूरदृष्टी, धाडस आणि विकासाचा वेग... हाच नव्या महाराष्ट्राचा मंत्र! "फक्त मनात जिद्द असून चालत नाही, तर ती प्रत्यक्षात उतरवण्याची दूरदृष्टीही असावी लागते..." माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात अभूतपूर्व झेप घेतली आहे. समृद्धी महामार्ग असो... अटल सेतूची अभिमानास्पद उंची असो... कोस्टल रोडचा वेग असो... नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असो... की मुंबई मेट्रोचे विस्तारलेले जाळे... प्रत्येक प्रकल्प हा विकसित महाराष्ट्राच्या स्वप्नाला आकार देणारा आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासातून सामान्य माणसाला नवे घर, सौर पंप योजनेतून शेतकऱ्याला ऊर्जा स्वावलंबन आणि मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकसारख्या प्रकल्पांतून विकासाला नवा वेग मिळत आहे. नव्या महाराष्ट्राच्या विकासगाथेचा हा केवळ आरंभ आहे..कारण विकास थांबलेला नाही, तो आता अधिक वेगाने धावतोय! #DevendraFadnavis #Maharashtra #Infrastructure #NirantarDhyas #NiranjanDavkhare
1
36
१२ वर्षे विश्वासाची, विकासाची आणि जनकल्याणाची! आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विकास, सुशासन आणि गरीब कल्याणाचा नवा इतिहास घडवला. ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र दादा चव्हाण यांनी मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या ऐतिहासिक कामगिरीचा आढावा मांडला. #12YearsOfSeva #ViksitBharat #NarendraModi #NirantarDhyas #NiranjaDavkhare
1
22
भारताच्या विकासगाथेला नवी दिशा देणारी युवा शक्ती! कौशल्य विकास, रोजगाराच्या नव्या संधी, नवोन्मेष, उद्योजकता, क्रीडा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतातील तरुणाई आज आत्मविश्वासाने आणि दृढ निश्चयाने देशाच्या प्रगतीचे नेतृत्व करत आहे. स्टार्टअप्सपासून स्पेस टेक्नॉलॉजीपर्यंत, खेळाच्या मैदानापासून जागतिक उद्योगविश्वापर्यंत भारतीय युवक आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. गेल्या १२ वर्षांत युवा शक्तीला संधी, कौशल्य आणि सक्षम व्यासपीठ मिळाल्यामुळे भारत आज जगातील सर्वात आशादायी आणि वेगाने प्रगती करणाऱ्या राष्ट्रांपैकी एक बनला आहे. युवकांच्या स्वप्नांना मिळालेली नवी झेप आणि त्यातून घडत असलेला विकसित भारत! #12YearsOfYuvaShakti #YuvaShakti #NirantarDhyas #NiranjanDavkhare
1
19
लेखक, नाटककार, कवी, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, प्रखर वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेते प्रल्हाद केशव अत्रे यांना स्मृतिदिनी विनम्र आदरांजली! आचार्य अत्रे हे मराठी साहित्यातील चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते. साहित्य, पत्रकारिता, शिक्षण, चित्रपट, समाजकारण आणि जनजागृती अशा विविध क्षेत्रांत त्यांनी अमूल्य योगदान दिले. आपल्या परखड लेखणीने, ओजस्वी वक्तृत्वाने आणि तल्लख बुद्धिमत्तेने त्यांनी जनमानसावर अमिट छाप निर्माण केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला आकार देण्यात आणि महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान दिले. #AcharyaAtre #SanyuktaMaharashtra #MarathiSahitya #NirantarDhyas #niranjandavkhare
33
स्वातंत्र्यसूर्य विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू, स्वातंत्र्यसेनानी गणेश दामोदर सावरकर अर्थात बाबाराव सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेल्या ‘अभिनव भारत’ संघटनेचे संस्थापक सदस्य म्हणून बाबारावांनी भारतीय तरुणाईमध्ये क्रांतीची ज्वाला चेतवण्यासाठी मोलाचे योगदान दिले. स्वातंत्र्यलढ्याची धुरा समर्थपणे सांभाळत त्यांनी राष्ट्रकार्यासाठी अनेक हालअपेष्टा सहन केल्या आणि अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षाही भोगली. क्रांतिकारक कार्यासोबतच ‘श्री शिवरायांची आग्र्यावरील गरुडझेप’, ‘वीरा-रत्नमंजुषा’, ‘हिंदुराष्ट्र – पूर्वी, आता नि पुढे’, ‘धर्म हवा कशाला?’ आणि ‘ख्रिस्तास परिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व’ यांसारख्या ग्रंथांद्वारे त्यांनी मराठी साहित्यविश्वालाही समृद्ध केले. #BabaraoSavarkar #AbhinavBharat #NirantarDhyas #niranjandavkhare
1
37