गोरगरिबांच्या आणि मध्यमवर्गीय मराठी घरात जन्मलेल्या नव्या पिढीला ज्ञानाची वाट जिथून पुढे उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाते, त्या मनपाच्या मराठी शाळा ह्या चालू ठेवणे हे सरकारचे आणि महापालिकेचे मुख्य उद्दिष्ट असायला हवे.. मात्र, चांदिवलीत उलट चित्र पहायला मिळत आहे.. एका बिल्डर मित्राच्या फायद्यासाठी, ही मित्रप्रेमी सरकार आणि महापालिका, सहा दशकांहून अधिक काळ अस्तित्वात असलेल्या दुर्गा देवी मनपा मराठी
शाळेला टाळा लावण्याच्या तयारीत आहे, हे अतिशय धक्कादायक आणि संतापजनक आहे.
शाळेतील एका वर्गाच्या भिंतीला तडे गेले असून, त्याच्या दुरुस्तीचे कारण पुढे करत संपूर्ण शाळा कायमस्वरूपी बंद करण्याचा घाट घातला जात आहे, असे इथल्या पालकांचे म्हणणे आहे.शाळेच्या मागच्या बाजूला असलेल्या चाळीला विकसित करू पाहणाऱ्या एका मोठ्या विकासाकासाठी हा खेळ मांडला गेला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या विरोधात त्यांनी आवाज उठवला आहे.
ही शाळा कुठल्याही परिस्थितीत आम्ही बंद पाडू देणार नाही.. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत.. कपटी सत्ताधाऱ्यांनी आपली आणि आपल्या मित्रांची हौसमौज पुरवण्यासाठी मराठी शाळेला बळी पाडू नये.. जरा गोरगरिबांच्या मुलांच्या भविष्याचा विचार करावा..
👉 मुळात, एका वर्गाच्या भिंतीला तडे गेल्यावर संपूर्ण शाळा बंद करण्याची गरज आहे का?
👉तात्पुरती दुरुस्ती करून उन्हाळ्याच्या सुट्टीत व्यापक दुरुस्तीचे काम हाती घेता येत नाही का?
👉 सध्या तात्पुरती दुरुस्ती करून उन्हाळ्याच्या सुट्टीत व्यापक दुरुस्तीचे काम हाती घेतले जाऊ शकत नाही का?
👉वार्षिक परीक्षा जवळ असताना विद्यार्थ्यांना २ किलोमीटर लांब असलेल्या दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करण्याचा निर्णय का घेतला जात आहे?