पहा, हा सूर्य आणि हा जयद्रथ!
विधिज्ञ सतीश उके यांचा महत्वाचा दावा!
तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारच्या दबावातूनच त्यांच्यावर ईडी लावण्यात आली होती आणि याचा देवेंद्र फडणवीस किंवा इतर भाजप नेत्यांशी कुठलाही संबंध नाही, असं सतीश उके 'एनडीटीव्ही मराठी'शी बोलताना म्हणाले आहेत."
सतीश उके यांना महाविकास आघाडी सरकारनेच या संपूर्ण प्रकरणामध्ये ईडी त्यांच्यावर लावण्यामध्ये दबाव आणला, असं सतीश उके यांचं म्हणणं आहे."
"त्यामुळे आता या प्रकरणामध्ये सतीश उके जामिनावर आले आहेत. तीन वर्षे ते ईडीच्या कोठडीमध्ये आर्थर रोड जेलमध्ये, तळोजा जेलमध्ये राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांची आता जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांचा हा दावा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांच्यावर जी ईडी लावण्यात आली, तेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं आणि महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं ईडी लावण्यासंदर्भात पत्र पाठवलं होतं, त्यामुळे ईडीची कारवाई झाली. त्यामुळे याच्यात तेव्हाच्या केंद्र सरकारचाही काही संबंध नव्हता, असं सतीश उके यांचं म्हणणं आहे."
"त्यामुळे संपूर्ण प्रकरणामध्ये महाविकास आघाडी सरकार - म्हणजे ज्या सरकारच्या नेत्यांचे ते वकील होते, त्याच सरकारच्या नेत्यांनी... त्याच सरकारने त्यांच्यावर ईडी लावली, असं थेट सतीश उके यांचं म्हणणं आहे.
महाविकास आघाडी म्हणजे
आपल्याच माणसाला अडकवण्यात करते कुरघोडी.