अशाच खोट्या अफवा पसरवून काँग्रेसला भारतात अराजकता पसरवायची आहे.
लोकशाही मार्गाने काँग्रेस जनमत मिळवू शकत नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे; म्हणूनच कधी गॅस सिलेंडर, कधी पेट्रोल-डिझेल, तर आता सोन्याबाबत अफवा पसरवून ते जनतेची दिशाभूल करत आहेत. संबंधित खोट्या माहितीचे 'आरबीआय'ने (RBI) आधीच अधिकृतपणे खंडन केले आहे; मात्र नेहमीप्रमाणे काँग्रेसचा भारतापेक्षा परदेशी संस्थांवर अधिक विश्वास आहे.
हजारो किलो सोने गहाण ठेवण्याची आणि उघडपणे चीनच्या घशात भारताची हजारो हेक्टर जमीन घालण्याची परंपरा काँग्रेसचीच आहे, हे जनता ओळखून आहे.
निवडणुकीत "काँग्रेस तुमचे मंगळसूत्र हिरावून घेईल" अशी भीती दाखवणाऱ्या मोदींनी या मे महिन्यात देशाचे जवळपास १ लाख कोटी रुपयांचे २०० टन सोने छुप्या मार्गाने विकून टाकले आहे…सर्व भारतीयांचे अभिनंदन!💐