महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय व कृष्णाई पब्लिक स्कूल पालम येथे शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या समवेत संवाद साधला. शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे या दृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले पाहिजे. आजचा काळ हा विज्ञान, तंत्रज्ञान शेती सामाजिक क्षेत्र, मानवी जाणीवा या मुलांच्या मध्ये वाढीस लगव्यात या दृष्टीने संस्कार रुजवण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे नातं हे मैत्रीच्या अनुषंगाने असावं जेणेकरून विद्यार्थ्यांना संवाद साधताना कसलीही भीती, दडपण जाणवणार नाही. असे मत यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी आमदार डॉ.रत्नाकरजी गुट्टे साहेब, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गणेशराव दादा रोकडे, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, माजी जिल्हा परिषद सदस्य किशनरावजी भोसले, मा. जिल्हा परिषद सदस्य रत्नाकरजी शिंदे (मालक), पोलीस निरीक्षक सुरेशजी थोरात, संदीपजी आळनुरे, बालासाहेब रोकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन रोकडे, माधवराव गायकवाड, नगरसेवक उबेद खान, माजी सभापती गणेशराव घोरपडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश हत्तीअंबीरे, विजय घोरपडे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Rajeshvitekar #schoolannualfunction #school #palam #ratnakrgutte
Ratnakar Gutte