गरम काय लागत आहे!
भाजपला नाव ठेवण्यात काहीच अर्थ नाही! साम दाम दंड भेद भाजप करणारच आहे.
का फुटतात हे नेते लोक एकतर पैसा आणि त्यांचे स्वतःच गैरकारभार!
ज्यांचे पक्ष फुटले त्यांना काहीच माहिती नाही अस पण होत नाही.
बाळासाहेब आंबेडकर अगोदर पासन सांगत आहे महाविकास आघाडी भाजप चालवत आहे.आघाडी मध्ये दम नाही भाजपला शिंगावर घेण्याचा.
पण सोयी चे पुरोगामी,यूट्यूब वाले आणि इच्छाधारी विचारवंत, समाजसेवक यांनी या आघाडीला बळच बाशिंग बांधून उभं केलं होत, खांद्यावर घेतलं आणि तेच आता कानात.........तर पुरोगामी विचारत आहे गरम काय लागत आहे.
सिरीयल किलर्स ऑफ डेमोक्रसी... या शब्दावर कॉपीराईट घेण्याची वेळ इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं.
तीन महिन्यात तीन पक्ष.. आप, तृणमूल आणि आता पुन्हा शिवसेना...
या फुटीबाबत कुठलंही राजकीय विश्लेषण हे निव्वळ बोगस आहे..
काहीही झालं तरी हे पक्ष फुटणारच.. यांना ते फोडायचेच आहेत...चटक लागली आहे एवढेच सत्य आहे.
केक खाणाऱ्यांबद्दल सहानुभूती ठेवावी की नाही याबद्दल प्रश्न पडला असेल तर फक्त लक्षात ठेवा हा एका पक्षाचा विषय नाही.
महाराष्ट्राच्या अस्मितेवर... गलितगात्र झालेल्या अस्मितेवर पुन्हा पुन्हा येऊन केलेला राजकीय बलात्कार आहे.
काही वाकडं करू शकत नाही तुम्ही आमचं... कायदा गेला..***.