वाचनाच्या नवीन पिढ्या रुजवण्यासाठी शब्दांचे वृक्षारोपण करणारे व्यासपीठ…📖 #पुस्तकआणिबरचकाही : pustakanibarachkahi.com

Joined May 2022
130 Photos and videos
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
Replying to @LetsReadIndia
@letsreadindia @granthopasak @PABKTweets #mustreadbook #वाचायलालागतंय #पुस्तक #वाचन #नादपुस्तकांचा #वेडपुस्तकांचे #वाचतराहूयाशिकतराहूया #मराठी #जिहाद #हुसेनजमादार “जिहाद” हे हुसेन जमादार यांचे आत्मचरित्र आहे. हे मराठी भाषेतील मुस्लिम समाजातील एक महत्त्वाचे आत्मकथन मानले जाते.
1
2
3
46
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) ✍🏻 सुरेश द्वादशीवार "...मी मूल्यांसाठी तुरुंगवास भोगला. ज्यांच्या दर्शनासाठी लोक येतात, त्यांचा रोष ओढवून घेतला. त्यांच्याशी असलेले पितृवत संबंध फुंकून टाकले. पण विचारांची कास सोडली नाही आणि थोरा-मोठ्यांचे पदर कधी सोडले नाहीत. ज्यांना मी ऐकविले ते महाराष्ट्राचे नामवंत वक्ते आणि आत-बाहेर संतवृत्ती धारण करणारे माझेच वडीलधारे होते. ते कमालीचे प्रामाणिक होते. माझे ऐकून ते म्हणाले, 'तू म्हणतोस ते खरे आहे'. मला माणसांचा मोह सोडवत नाही. त्यासाठी त्यांच्या प्रमादांकडे दुर्लक्ष करणे कमीपणाचे वाटत नाही. पण त्यांच्याविषयीच्या माझ्या विश्वासाचे टवके मात्र नेहमीच उडत असतात. 'तरुण भारत' मध्ये असताना मी संघाचा नव्हतो, 'लोकमत'मध्ये राहून मी काँग्रेसचा झालो नाही आणि 'लोकसत्ता'त असतानाही मी संचालकांची तरफदारी कधी केली नाही. पदे सोडली, संघटना सोडल्या, एकटे राहणे पसंत केले अन् त्यासाठी प्रत्येक पावलागणिक तसे राहण्याची किंमत चुकवत राहिलो. किमतीहून मूल्य मोठे असते, असे तूही म्हणायचीस. माझ्या तशा निर्णयांच्या मागे दर वेळी तू उभी राहिलीस..." #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
1
11
31
744
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
जेन आयर  लेखिका - शार्लट ब्रांटी  अनुवाद - गायत्री साळवणकर  जागतिक स्तरावर नावाजलेल्या या कादंबरीच्या माध्यमातून लेखिकेने जगाला हे दाखवून दिले की, स्त्रीचे सौंदर्य तिच्या चेहऱ्यावर किंवा संपत्तीत नसून फक्त तिच्या बुद्धीमध्ये, चारित्र्यामध्ये 👇 @LetsReadIndia @PABKTweets
3
8
27
576
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) The Fragrance of Rain is a vivid portrait of India’s most distinct season—the monsoon. From the first crack of thunder in the salt-heavy air of Kerala, to raging storms over Mussoorie and the rain-drenched forests of Goa, award-winning author Stephen Alter follows the great weather system that has steered traders across oceans, carved river valleys, fuelled entire ecosystems, inspired generations of poets, and unsettled empires. Along the way, we meet perfumers in Kannauj who bottle the scent of rain, Nilgiri tahr grazing in cloud gardens, herpetologists tracking glowing fungi and elusive caecilians, fishermen watching the sky for warnings, and artists, musicians, and writers who have given the monsoon its enduring metaphors. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
3
14
363
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
पुस्तकं जे तुमच्या आयुष्यात एकदा नक्की वाचलेच पाहिजेत ! वरील पुस्तकांच्या अधिक आणि सखोल माहितीसाठी संपर्क साधा माय मुक्ता पब्लिकेशन मो नं / व्हाट्सअप नं : ९५०३६५२५९६ #पुस्तक #मराठी_पुस्तक #books📚 #marathi
1
11
40
1,725
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) ✍🏻 #पुलदेशपांडे सुजनहो ! "...संगीताचा जो उपासक तो माझा आप्तच. तो माझा नातलगचं. मग कोणी वयानं वडील, कोणी वयानं धाकटा, कोणी मित्र. एखादा माणूस गातो, एवढं मला कळलं म्हणजे आनंदच होतो. या जगामध्ये इतकी माणसं आचरट उद्योग करीत असतात की, त्यांत कोणालातरी आपण गावं असं वाटणं हा दुर्मिळ योगच आहे. जीवन सुरेल ठेवण्यापेक्षा बेसूर करण्याकडेच प्रवृत्ती असल्याचं आपल्याला दिसतं. या जगामध्ये कोणीतरी सुरांच्या शोधामध्ये निघालेलं आहे असं दिसलं की तोच माझं सगळं काही. विचार करायला लागलं की असं वाटतं, आपलं जीवन अशा रितीनं श्रीमंत करण्यामध्ये हजारो लोकांनी मदत केलेली आहे, हजारो गीतांनी मदत केलेली आहे. रस्त्यावरून चाललो असताना नकळत एखाद्या वेळेला रेडिओवरून लता मंगेशकरांची एखादी लकेर येते आणि आपल्या श्रीमंतीत भर टाकून जाते. अलंकार केवढा मोठा आहे याला काही किंमत द्यावी असं मला वाटत नाही. तो किती सुंदर आहे, किती आल्हादक आहे, यालाच किंमत द्यायला पाहिजे..." #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
4
19
394
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
पोलीस  अधिकारी असलेल्या लेखकाने नक्षलग्रस्त भागात काम करताना पाहिलेले, अनुभवलेले आणि जाणवलेले वास्तव यात शब्दबद्ध केले आहे.
" लाल पाणी " एके दिवशी सकाळी सकाळीच मी ती बातमी वाचली. ती वाचून सुन्न झालो. मोठ्याने रडावे वाटत होते, पायात त्राण राहिले नव्हते. मटकन खुर्चीत बसलो. किती तरी वेळ मी तसाच बसून होतो. कुणी तरी दरवाजा ढकलून आत आले. कोण आहे न बघता मी तसाच टेबलवर डोके ठेवून बसून होतो. काय झालं, असा का बसलाय? चित्राचा आवाज कानावर पडला, मी तिच्याकडे पाहिले, माझ्या डोळ्यांत पाणी होते. "दिवाकर... काय झालं, का रडतोयस... घरी सगळं ठीक आहे ना?" डोळे पुसत बोलली. तसा माझा बांध सुटला. मी हमसून हमसून रडू लागलो. किती वेळ रडतोय याचं भानच उरलं नव्हतं. माझ्या आत साठलेले सगळे काही एकदम बाहेर पडत होते. लहानपणापासून मनात दडवलेली असाह्यता, राग, अपमान सगळे. चित्रा क्षणभर गोंधळली असावी. नेमके काय झालेय, हे तिलाही कळत नव्हते. तिने मला विचारले; पण मी काहीच बोललो नाही. शब्दच नव्हते माझ्याकडे. मग तिने काहीच न बोलता मला रडू दिले. ती फक्त माझ्या पाठीवर थोपटत राहिली... हळू, स्थिर, संयमाने. जणू मला सांगत होती, मोकळा हो, मी इथंच आहे. काही वेळाने मला थोडे हलके वाटू लागले. श्वास नीट होऊ लागला. तसे तिने शांतपणे विचारले, 'काय झालं?' मी उत्तर दिले नाही. टेबलावर पडलेल्या वर्तमानपत्राकडे हाताने इशारा केला. तिने ते उचलले. पहिलीच बातमी होती... थंजावूर जिल्ह्यातील किल्वेनमणी इथं भयंकर हत्याकांड... ४४ दलित मजूर, बहुतेक महिला आणि मुलं जिवंत जाळण्यात आली. चित्राने बातमी वाचून शांतपणे वर्तमानपत्र टेबलवर ठेवले. ती बातमी तिने अगोदरच वाचली असल्याचे तिच्या चेहऱ्यावरून मला समजले. माझ्या मनात प्रश्नांची गर्दी झाली. एवढी भयंकर घटना घडूनसुद्धा चित्रा एवढी शांत कशी ? हिला दुःख झालेय की नाही? हिला भावना आहेत की नाहीत ? आणि जर हिला एवढे काहीच वाटत नसेल, तर तिचे माझ्यावरचे प्रेम तरी खरे आहे का? हे सगळे प्रश्न माझ्या मनात घोंघावत राहिले. चित्रा मात्र शांत होती. मला पाणी दिले आणि दुसरी खुर्ची ओढून माझ्याशेजारी बसली... "चित्रा, तू बातमी वाचली होतीस?" "हो, मी सकाळीच वाचली." "तुला दुःख झालं नाही." "रडतो त्यालाच दुःख होतं, असं काही आहे का? प्रत्येक वेळी रडायलाच हवं का?" माझ्या डोळ्यांत डोळे घालून अगदी शांत आवाजात ती म्हणाली, "क्रांतिकारकांना रडता येत नाही. त्यांनी डोळ्यांतून अश्रू नाही, तर बंदुकीतून गोळ्या काढायच्या असतात. जालियनवाला बाग हत्याकांड झालं, तेव्हा भगतसिंग रडत बसले नाहीत; त्यांनी साँडर्सच्या छातीत गोळ्या घातल्या." क्षणभर थांबली. मग पुढे म्हणाली, "कुणा कुणासाठी रडणार आहेस तू? तुकारामासाठी? चार्वाकासाठी? गांधीसाठी? की आजवर बळी गेलेल्या लाखो दीनदुबळ्या दलित-आदिवासींसाठी?" ती थेट माझ्याकडे पाहत म्हणाली, "जर एवढंच दुःख झालंय, तर उचल बंदूक... आणि त्यांना गोळ्या घाल, बंदुकीशिवाय बदल घडणार नाही." तिच्या बोलण्याने मी दचकलो. तिचे डोळे आग ओकत होते. "पण बदलासाठी हिंसाच अंतिम मार्ग आहे का?" "तुझ्याकडे दुसरा मार्ग आहे का?" "कोर्टात जाऊन न्याय मागू, नाही मिळाला तर व्यवस्थेला प्रश्न विचारू.' "जेव्हा हजारो वर्षांचा अन्याय प्रश्न विचारून बदलत नाही, तेव्हा हिंसा अपरिहार्य ठरते." "दोन्ही बाजूंनी हिंसाच केली तर काय उरेल, याचाही विचार करायला हवा." मी शांतपणे विचारले. "उरेल काय? उरेल स्वाभिमान. हक्काचं आयुष्य. तुला कायद्याने न्याय हवाय, विश्वास हवाय, मला समजतं. पण, कायदा कुणाचा असतो, हेही आपण पाहायला हवं. पण तरीही त्यांना कायद्याने शिक्षा व्हायला हवी. तुला वाटतं कायदा त्यांना शिक्षा देईल? कायदा शिक्षा देऊ शकला असता, तर त्यांनी हा गुन्हाच केला नसता." तिचे डोळे चमकले. शेवटी मी निर्धाराने म्हणालो, "म्हणजे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आपणच मोडायचं? संविधान बंदुकीपेक्षा मोठं आहे." "तुला वाटतं कायदा त्यांना शिक्षा देईल, कायदा शिक्षा देऊ शकला असता तर त्यांनी तो गुन्हा केलाच नसता." परत एकदा तिचा तोच प्रश्न. "न्याय न्यायालयात जाऊन मिळणार नाही. कारण, न्याय शक्तिशाली व्यक्तीच्या पारड्यात टाकला जातो ना की पीडितांच्या. जो शक्तिशाली आहे न्याय त्याचाच. इतिहासाची पानं उघडून बघा, न्याय शस्त्राच्या जोरावरच मिळतो. स्वातंत्र्य अहिंसेने मिळाले नाही, मिळाले ते बंदुकीच्या जोरावर. आजपर्यंत आपण कधी कुणावर हल्ला केला नाही, कुणावर अन्याय केला नाही. काय मिळाले आपल्याला? गरिबी, अन्याय, अत्याचार, कुणीही यावं आणि टपली मारून जावं, ही आपली तऱ्हा. त्यांच्या लहान मुलालाही कम रेत वाकून नमस्कार करावा. का झालं हे? कारण आपण शस्त्र विसरलो." लेखक :- सुरेश जायभाय (PSI) किंमत :- 399/- संपर्क :-9975376279
1
4
183
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
Some books tell a story. Some books become part of your own. The Alchemist by Paulo Coelho follows a young shepherd’s journey, but its real destination lies somewhere within the reader. Thoughtful, hopeful, and endlessly quotable, it’s a book about dreams, doubt, and listening to the quiet voice that keeps urging you forward. A modern classic that still finds new readers every year. 📖✨ @LetsReadIndia 📚📚📚
2
6
182
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
महाराष्ट्राचे लाडके लेखक पु. ल. देशपांडे यांचा आज स्मृतिदिन! तू गेलास उद्या मीही नाहीशी होणार.पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द, मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वत:च्या तेजानं चमकतच राहील ना ? - सुनीताबाई देशपांडे
1
5
24
424
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
काल पुण्यात दिनमान पब्लिकेशन आयोजित "छंद आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धे" चा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. आमच्या #अनलॉक २०२५ #दिवाळीअंक ला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला. "जग बदलून टाकणाऱ्या महिला" हा या अंकाचा विषय होता. 👇
1
3
7
288
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
पुस्तकं जे तुमच्या आयुष्यात एकदा नक्की वाचलेच पाहिजेत ! वरील पुस्तकांच्या अधिक आणि सखोल माहितीसाठी संपर्क साधा माय मुक्ता पब्लिकेशन मो नं / व्हाट्सअप नं : ९५०३६५२५९६ #पुस्तक #मराठी_पुस्तक #books📚 #marathi
1
10
49
2,493
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
कोल्हाट्याचं पोर ❤️ एखादं पुस्तक आपण वाचतो, काही पुस्तकं आपल्याला आवडतात, काही पुस्तकं विचार करायला लावतात; पण ‘कोल्हाट्याचं पोर’ हे असं पुस्तक आहे जे वाचकाच्या मनात खोलवर उतरून त्याला अस्वस्थ करतं. पुस्तकाची काही पानं वाचल्यानंतरच लक्षात येतं की ही केवळ एका व्यक्तीची आत्मकथा नाही, तर समाजाच्या उपेक्षित, दुर्लक्षित आणि शोषित घटकांच्या वेदनांचा इतिहास आहे. लेखक किशोर शांताबाई काळे यांनी स्वतःच्या आयुष्याचा प्रवास अत्यंत प्रामाणिकपणे मांडला आहे. या कथेत कुठेही कृत्रिमता नाही, नाट्यमयता नाही किंवा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न नाही. उलट प्रत्येक प्रसंग वास्तवाच्या इतका जवळचा वाटतो की वाचक नकळत त्या जगाचा भाग बनतो. कोल्हाटी समाजातील स्त्रियांचे जीवन, त्यांच्यावर होणारे अन्याय, त्यांच्या श्रमांवर जगणारी पुरुषप्रधान व्यवस्था आणि त्या वातावरणात वाढणाऱ्या मुलांचे आयुष्य हे सर्व वाचताना मन सुन्न होत जाते. या पुस्तकाशी माझं एक वेगळंच नातं जोडले गेलं. पुस्तकात उल्लेख असलेलं लेखकाचं आजोळ माझ्या करमाळा तालुक्यातील नेरले हे गाव आहे. लेखकाने आपल्या आयुष्यातील अनेक क्षण या गावात घालवले आहेत. त्यामुळे पुस्तकातील अनेक संदर्भ, वातावरण, माणसं आणि प्रसंग वाचताना ते माझ्यासाठी केवळ शब्द राहिले नाहीत, तर अगदी जवळचे आणि ओळखीचे वाटू लागले. ज्या भूमीशी आपण स्वतः जोडलेलो असतो, त्या भूमीतील संघर्ष आणि कथा वाचताना निर्माण होणारी भावना वेगळीच असते. त्यामुळे हे पुस्तक वाचताना मी केवळ एक वाचक राहिलो नाही, तर त्या अनुभवांचा एक भाग असल्यासारखं मला वाटत राहिलं. या पुस्तकातील सर्वात प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे लेखकाची आई. एका आईने आपल्या मुलासाठी केलेला त्याग, सहन केलेला अपमान आणि जगण्याची केलेली धडपड वाचताना मन भरून येते. तिचं आयुष्य म्हणजे संघर्षाचा अखंड प्रवास आहे. समाजाने तिला सन्मान दिला नाही, सुरक्षितता दिली नाही; पण तिने आपल्या मुलाला शिक्षण देण्याचं स्वप्न मात्र कधी सोडलं नाही. तिच्या व्यक्तिरेखेतून स्त्रीची ताकद, सहनशीलता आणि ममत्व यांचं अत्यंत हृदयस्पर्शी दर्शन घडतं. पुस्तकातील अनेक प्रसंग वाचताना रागही येतो. एका समाजातील स्त्रियांना केवळ परंपरेच्या नावाखाली अपमानास्पद जीवन जगावं लागतं, त्यांच्या मुलांना वडिलांचं नाव मिळत नाही, त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार नाकारला जातो, ही वस्तुस्थिती मनाला अस्वस्थ करते. समाजातील विषमता आणि अन्याय किती खोलवर रुजलेला आहे याची प्रकर्षाने जाणीव होते. मात्र हे पुस्तक फक्त दुःखाची कहाणी नाही. ही जिद्दीची आणि आत्मसन्मानाचीही कथा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेला एक मुलगा शिक्षणाच्या बळावर डॉक्टर होतो, स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करतो आणि समाजासमोर आदर्श उभा करतो. त्यामुळे पुस्तक वाचताना जिथे डोळे पाणावतात, तिथेच मनात आशेचा किरणही निर्माण होतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी चिकाटी, मेहनत आणि शिक्षण यांच्या जोरावर आयुष्य बदलता येतं, हा संदेश पुस्तक अत्यंत प्रभावीपणे देतं. लेखकाची भाषा साधी, सरळ आणि मनाला भिडणारी आहे. शब्दांमध्ये अलंकार नसले तरी अनुभवांचं वजन इतकं मोठं आहे की प्रत्येक वाक्य मनावर कोरलं जातं. पुस्तक वाचताना अनेक वेळा असं वाटतं की आपण एखादी कथा वाचत नसून प्रत्यक्ष त्या घटना अनुभवत आहोत. ‘कोल्हाट्याचं पोर’ हे पुस्तक वाचून झाल्यावर मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. समाज म्हणून आपण खरंच किती पुढे आलो आहोत? आजही अनेक लोकांना सन्मानाने जगण्याचा हक्क का मिळत नाही? स्त्रियांच्या आयुष्याविषयीची आपली दृष्टी कितपत बदलली आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यास हे पुस्तक भाग पाडतं. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की ‘कोल्हाट्याचं पोर’ हे पुस्तक केवळ वाचायचं नसतं, ते अनुभवायचं असतं. ते वाचकाला रडवतं, अस्वस्थ करतं, विचार करायला लावतं आणि त्याच वेळी संघर्षातून उभं राहण्याची प्रेरणाही देतं. एका आईच्या त्यागाची, एका मुलाच्या जिद्दीची आणि एका समाजाच्या वेदनेची ही कहाणी मराठी साहित्यातील अत्यंत महत्त्वाची आणि दीर्घकाळ स्मरणात राहणारी साहित्यकृती आहे. “हे पुस्तक वाचताना मनात करुणा दाटते, अन्यायाविरुद्ध संताप निर्माण होतो, आईबद्दलचा आदर वाढतो आणि शिक्षणाच्या सामर्थ्यावरचा विश्वास अधिक दृढ होतो. म्हणूनच ‘कोल्हाट्याचं पोर’ हे केवळ आत्मचरित्र नसून माणुसकीला जागं करणारा एक जिवंत अनुभव आहे.” ~ महेंद्र कोलते-पाटील
8
15
63
2,071
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) ✍🏻 म. द. हातकणंगलेकर "टीकास्वयंवर" हा समीक्षालेखांचा ग्रंथ १९९० साली प्रसिद्ध झाला. त्यातील लेखांवरून व मुलाखतींवरून डॉ. भालचंद्र नेमाडे यांची साहित्यविषयक भूमिका नेमकेपणाने समजण्यास मदत होते. त्यांची मते किती मूलगामी आणि प्रक्षोभक असू शकतात, याची आता मराठी वाचकांना चांगली कल्पना आलेली आहे. आज त्यांचे टीकालेखन महत्त्वाचे काम करीत आहे. एकूण डॉ. भालचंद्र नेमाडे साहित्य व्यवहाराकडे अत्यंत गांभीर्याने पाहणारे समीक्षक आहेत. त्यांचे विचार प्रक्षोभक, बंडखोर, प्रस्थापितांचे वेळोवेळी वस्त्रहरण करणारे असले तरी आजच्या वाङ्मयीन संस्कृतीचे कुंठितपण घालविण्यासाठी आणि तिला योग्य दिशा कोणती व कां हे समजावून देण्यासाठी त्यांचा फार मोठा उपयोग होणार आहे, यात शंका नाही. त्यांना अभिप्रेत असलेली भाषिक कृती डॉ. नेमाडे आपल्या कादंबऱ्यांतूनच नव्हे तर आपल्या समीक्षाविचारांतून जबाबदारीने व चोखपणे करीत आहेत. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
2
13
375
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
📚✨ What happens when a child reads every day? Every page builds imagination. Every story grows empathy. Every book opens a new world. Today's readers become tomorrow's thinkers, creators, and leaders. #LetsReadIndia📚📚📚
3
4
131
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
श्री सुरेश जयभाव सर आपले पुस्तक मिळाले. आभार आणि धन्यवाद 🙏 🙏 @JaybhaySuresh @LetsReadIndia @PABKTweets
3
7
21
774
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर । नवीन पुस्तक 📕 #एक_भाकर_तीन_चुली #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #पुस्तकांशी_सलगी @LetsReadIndia @Gramayanofficia @granthopasak @pustakaayan
7
16
417
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
Please do watch .. Thanks dear @nitinbrahme for sharing . Loved Prof Keshav Waghmare’s speech .. what a clarity ! भाषांतरे आणि विच्छेद |Translations| 19th-Century| Marathi Theatre| Mahat... youtu.be/C6ZsLtGi3Jc?si=B4Gk… via @YouTube
2
3
460
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) "...आकर्षणाच्या, मोहाच्या हकिकती सांगणाऱ्या या आठ कथा. सूत्र एकच- कक्षेबाहेरची ओढ. वरकरणी गुण्यागोविंदानं संसार करताना बाधा होते, अन् माणसाला निराळी ओढ लागते. या साऱ्या कथा याच आकर्षणानं- मोहानं बाधलेल्या. पण कुठेतरी प्रामाणिकपणा, भयगंड, आशंका, भाबडेपणा, ओढ. अशा पुष्कळशा भावभावनांच्या सरमिसळीमुळे नीतिनियमांना उल्लंघूनही समाज-मयदिची चौकट न सोडलेल्या. आणि म्हणूनच आरपार..." ही बाधा, हे आकर्षण याचा अत्यंत गांभीर्यानं केलेला विचार हे जसं या कथांचं वैशिष्ट्य, तसंच एकाच विषयाच्या कथांचा संग्रह हे आणखी एक वैशिष्ट्य. आकर्षणाची ही चमचमती बाधा – शिशीत काजवे ठेवावेत तशी– एकत्रित ठेवून पाहायचा हा प्रयत्न ! #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
1
6
15
276
पुस्तकं आणि बरच काही 📖 retweeted
रिंगाण ❤️ मराठी साहित्यात ग्रामीण जीवन, शेती, दुष्काळ, स्थलांतर आणि विकासाच्या प्रश्नांवर अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. मात्र ‘रिंगाण’ ही कादंबरी या विषयांना केवळ सामाजिक प्रश्न म्हणून न पाहता त्यांना उत्क्रांती, पर्यावरण आणि अस्तित्वाच्या व्यापक संदर्भात मांडते. २०२३ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेली ही कादंबरी आधुनिक विकासाच्या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उभे करते आणि विस्थापितांच्या वेदनांना नवी साहित्यिक उंची देते. कृष्णात खोत यांनी ग्रामीण जीवनातील वास्तवाचे चित्रण करताना केवळ माणसांचे दुःख मांडले नाही; तर निसर्ग, प्राणी आणि मानव यांच्या परस्परसंबंधांचा एक तत्त्वचिंतनात्मक पट उलगडला आहे. त्यामुळे ‘रिंगाण’ ही फक्त एक सामाजिक कादंबरी राहत नाही, तर ती मानवी अस्तित्वाचा शोध घेणारी कलाकृती ठरते. ‘रिंगाण’ या शब्दाचा अर्थ वर्तुळ, घेरा किंवा जीवनाचे अखंड चक्र असा होतो. कादंबरीत हे शीर्षक अत्यंत अर्थपूर्ण आहे. माणूस, निसर्ग, प्राणी, विकास, विनाश आणि पुनर्निर्मिती यांचे एक अखंड रिंगण सतत चालू असते. या चक्रात काही जिंकतात, काही हरतात; परंतु संघर्ष कधीही थांबत नाही. लेखकाने ‘रिंगाण’ या शीर्षकातून जीवनाच्या चिरंतन संघर्षाचे रूपक उभे केले आहे. कादंबरीचा केंद्रबिंदू म्हणजे धरणामुळे विस्थापित होणारे गाव आणि त्या गावातील माणसे. विकासाच्या नावाखाली गाव पाण्याखाली जाणार असते. पिढ्यानपिढ्या ज्या मातीत लोक जगले, श्रमले आणि स्वप्ने पाहिली, ती माती त्यांच्यापासून हिरावून घेतली जाते. विस्थापनामुळे केवळ घरांचा नाश होत नाही, तर लोकांच्या आठवणी, संस्कृती, नाती आणि ओळखदेखील नष्ट होते. या संपूर्ण प्रक्रियेत माणूस आणि निसर्ग दोघेही जखमी होतात. लेखकाने हा संघर्ष कोणत्याही राजकीय घोषणाबाजीशिवाय अत्यंत वास्तववादी पद्धतीने मांडला आहे. धरण बांधल्यामुळे हजारो लोकांना आपले गाव सोडावे लागते. शासनाच्या नोंदींमध्ये हे फक्त स्थलांतर असते; परंतु प्रत्यक्षात ती एका संपूर्ण जीवनपद्धतीची समाप्ती असते. लेखक दाखवतो की माणूस केवळ जमिनीवर राहत नाही; तो त्या जमिनीशी भावनिकदृष्ट्याही जोडलेला असतो. म्हणूनच विस्थापन ही केवळ आर्थिक समस्या नसून मानसिक आणि सांस्कृतिक शोकांतिका आहे. कादंबरीत निसर्ग हा केवळ पार्श्वभूमी नाही; तो एक जिवंत पात्र आहे. डोंगर, जंगल, पाणी, जनावरे आणि पक्षी यांच्याशी माणसाचे असलेले नाते लेखकाने अत्यंत प्रभावीपणे रंगवले आहे.आधुनिक विकासाच्या नावाखाली जेव्हा निसर्ग उद्ध्वस्त होतो, तेव्हा त्याचे परिणाम फक्त पर्यावरणावर नाहीत, तर मानवी जीवनावरही होतात. हा संदेश कादंबरीच्या प्रत्येक स्तरावर जाणवतो. ‘रिंगाण’ची सर्वात वेगळी बाब म्हणजे उत्क्रांतीविषयीचा दृष्टिकोन. सामान्यतः उत्क्रांतीचा विचार जीवशास्त्रीय बदलांशी जोडला जातो; परंतु लेखकाने सामाजिक आणि मानसिक उत्क्रांतीचाही विचार केला आहे. माणूस परिस्थितीनुसार बदलतो, संघर्ष करतो आणि स्वतःला नव्याने घडवतो. परंतु या प्रक्रियेत त्याच्या मूलभूत मूल्यांचे काय होते? हा प्रश्न लेखक उपस्थित करतो. कादंबरीत विकासाच्या मॉडेलवर सूक्ष्म टीका आहे. धरणामुळे शहरांना पाणी आणि वीज मिळते; परंतु त्यासाठी गावांचे अस्तित्व नष्ट होते. मग खरा विकास कोणाचा? हा प्रश्न लेखक थेट विचारत नाही, पण संपूर्ण कथानकातून तो वाचकाच्या मनात निर्माण करतो. कृष्णात खोत यांची पात्रे ही आदर्शवादी किंवा काल्पनिक नाहीत. ती आपल्या आजूबाजूला दिसणारी सामान्य माणसे आहेत. त्यांच्या भावना, दुःख, संघर्ष आणि आशा यांचे चित्रण अत्यंत वास्तववादी आहे. त्यामुळे वाचक त्या पात्रांशी सहज समरस होतो. पात्रांच्या माध्यमातून लेखकाने संपूर्ण ग्रामीण समाजाचे प्रतिनिधित्व केले आहे. ‘रिंगाण’ची भाषा हे तिचे मोठे सामर्थ्य आहे. ग्रामीण बोलीचा नैसर्गिक वापर, चित्रदर्शी वर्णनशैली, संवेदनशील संवाद, प्रतीकात्मकता आणि रूपकांचा प्रभावी उपयोग यामुळे वाचन अनुभव अधिक जिवंत होतो. काही प्रसंग इतके प्रभावी आहेत की वाचकाला ते दृश्य स्वरूपात दिसू लागतात. कादंबरी केवळ कथा सांगत नाही; ती जीवन, निसर्ग आणि विकास यांविषयी विचार करायला भाग पाडते. मराठी साहित्यात पर्यावरण आणि मानवी अस्तित्व यांचा इतका सखोल संबंध दाखवणाऱ्या कादंबऱ्या फार कमी आहेत. या कादंबरीच्या काही मर्यादा ही आहेत. कथन काही ठिकाणी संथ वाटू शकते. ग्रामीण बोलीभाषेतील काही शब्द सर्व वाचकांना लगेच समजतीलच असे नाही. तत्त्वचिंतनात्मक भागांमुळे हलकेफुलके वाचन अपेक्षित असलेल्या वाचकांना ती थोडी गंभीर वाटू शकते. 👇🏻👇🏻
1
14
51
1,636