संकेत नारगुडे यांच्या फेसबुक वॉलवरून:-
भाजप निवडणूक कशी जिंकते याचे दृश्य.1👇
25 ऑक्टोबर रोजी मी माझ्या टीमसोबत बक्सर मधील एका हॉटेलमध्ये जेवत होतो,पुढच्या टेबलावर भाजपचे बॅज घातलेले काही नेते व कार्यकर्ते बसले होते,त्यापैकी एक जण माझ्या कडे पाहत होता,मी त्याला ओळखण्याचा प्रयत्न करत होतो,तेवढ्यात ते माझ्याकडे आले आणि म्हणाले,
नमस्कार मी सतीश गौतम असून अलिगडचा भाजप खासदार आहे, मी विचारले, तुम्ही इथे.? ते म्हणाले मी एका महिन्यापासून बक्सरमध्ये आहे.
जुजबी गप्पा सह ते म्हणाले यावेळी आम्ही बक्सर जिंकू,अन थोड्या वेळाने संभाषण केल्यानंतर ते त्यांच्या जागेवर गेले,अन मी भाजप निवडणुका कशा पद्धतीने लढवते याचा विचार करू लागलो,
याचे एक उदाहरण म्हणजे सतीश गौतम अलिगडचे एक खासदार बक्सरमध्ये अनेक लोकांसह तळ ठोकून आहेत,अर्थातच आणखी बरेच लोक असतील,पण शेवटी भाजपने बक्सर जिंकले.
दृश्य 2.👇
दुसऱ्या दिवशी तेथून आरा मार्गे पाटणा येथे परतताना रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये काही लोक भाजपचे पत्रके वाटताना मी पाहिले,मग माझी नजर उत्तर प्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष आणि योगी सरकारचे कॅबिनेट मंत्री स्वतंत्र देव सिंह यांच्यावर पडली,मी गाडी थोडी पुढे थांबवली आणि मागे वळून पाहिले की ते खरोखर स्वतंत्र देव आहेत की दुसरे कोणी,
मला कळले की स्वतंत्र देव रस्त्याच्या कडेला काही लोकांसोबत दुकानदार आणि झोपडपट्टीवासीयांशी बोलत चालले होते.
कल्पना करा,उत्तर प्रदेशचा एक मोठा नेता रस्त्याच्या कडेला काही कार्यकर्त्यांसह प्रचार करत होता,कॅमेरा नव्हता,प्रसिद्धी नव्हती,रील नव्हती,
असे भाजपचे अनेक लोकं आपल्या कार्यात बिहारभर कार्यरत होती,अन आपले मोठेपण विसरून इमानेइतबारे पक्षाचं काम करत होती.
दृश्य 3.👇
पहिल्या फेरीच्या निवडणुकीनंतर मी किशनगंज मधील दफ्तारी पॅलेस हॉटेलच्या बाहेर माझ्या गाडीतून सामान उतरवत होतो,तेव्हा एक गृहस्थ माझ्याकडे आले,त्यांनी स्वतःची ओळख सुरत मधील एक व्यापारी म्हणून करून दिली आणि सांगितले की ते काही दिवसांपासून तेघरा येथे तैनात आहेत आणि आम्ही रजनीश कुमार यांच्या विजयासाठी दिवसरात्र काम केले आहे,त्या गुजराती गृहस्थांनी रजनीश कुमार यांना 110000 पेक्षा जास्त मते कशी मिळतील आणि ते मोठ्या फरकाने कसे जिंकतील याचे संपूर्ण गणित स्पष्टपणे सांगितले.
आमचं बोलणं संपलं अन त्यांनी त्यांचा फोन नंबर दिला आणि दावा केला,जर तुम्हाला हवे असेल तर निकालाच्या दिवशी मला फोन करा,मी आज पाहत आहे की रजनीश कुमार 35000 हजार मतांनी विजयी झाले आहेत,अन त्यांना 1,12,000 मते पडली आहेत, विद्यमान सीपीआय आमदार निवडणूक हरले आहेत,ते म्हणाला होता आता आम्ही किशनगंज जिल्ह्यात काम करण्यासाठी आलो आहोत.
गुजरातमधील किती लोक वेगवेगळ्या भागात आले आहेत आणि महिनाभर तिथे राहत आहेत हे देखील त्यानीं उत्साहाने वर्णन केले होते,बिहार मध्ये एक-दोन महिने भाजपसाठी काम करणारे इतके लोक होते की त्यात डझनभर मुख्यमंत्री, डझनभर कॅबिनेट मंत्री,दोनशेहून अधिक खासदार आणि विविध राज्यांतील हजारो लोक तैनात होते,
बिहारमधील एनडीएच्या विजयाचे स्पष्टीकरण देताना मी एवढंच सांगेन की भाजप निवडणुका अश्या पद्धतीने जमिनीवर लढतो हे देखील समजून घेतले पाहिजे.
नरेंद्र मोदीचें घोरविरोधी पत्रकार अजित अंजुम यांनी आपल्या सोशल मीडियावर हँडलवर त्यांचा बिहार निवडणुकीतील अनुभव शेअर करताना हे लिहले आहे.
Sanket Naragude